नवी मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ):-वक्फ बोर्ड सुधारणेची अनेक वर्षाची मागणी नव्या कायद्यामुळे पूर्ण झाली असून,8 एप्रिल पासून लागू झाल्या मुळे देशाच्या सामान्य माणसाच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्याच काम केंद्र सरकारने केले असल्याची प्रतक्रिया प डॉ विखे पाटील कृषी परिषदेच्या अध्यक्षा सौ अनुजा साळवी यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलतांना सौ अनुजा साळवी म्हणाले की वक्फ बोर्डाच्या माध्यमातून फक्त जमीनी बिल्डर लोकांच्या घशात घालण्याचे काम सुरू होते.हिंदूच्या जमीनी सुध्दा वक्फ बोर्डाकडे हस्तांतर करण्याचे काम सुरू होते.मूठभर मुस्लिमांनी जमीनी बळकावण्याचे काम सुरू होते एकाही मुस्लिमांचा उत्कर्ष वक्फ बोर्डच्या माध्यमातून झाल्याचे उदाहरण नसल्याचे स्पष्ट करून उध्दव ठाकरे गटाने या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना हिंदूत्ववादी म्हणणाच्या कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले.
जेष्ठ नेते शरद पवार याच्या भूमिकेवर मिश्कील टिपणी करताना सौ अनुजा साळवी म्हणाल्या की समाज माध्यामात त्यांच्याबद्दल आलेले एक कार्टून पुरेस बोलक होत प्रसंगी वक्फ बोर्डाचे अध्यक्षपद मिळेल म्हणून ते सभागृहात अनुपस्थित राहीले असावेत असा खोचक टोला ही लगावला.



