नगर(जनता आवाज वृत्तसेवा):- नगर तालुक्यातील डोंगरगण येथील सरपंच वैशाली मते, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई कदम, भिमाबाई कोकाटे, अशोक चांदणे, सर्जेराव मते व पद्माताई काळे सर्जेराव मते हे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले त्यामुळे राहुरी मतदार संघातील नगर तालुक्यातील गावांमध्ये तनपुरे गटाचे अस्तित्व संपल्यात जमा आहे काही दिवसांपूर्वीच तनपुरे गटाचे प्राबल्य असलेल्या इमामपूर ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले होते.
त्यानंतर आ. कर्डिले यांनी तेथील विकासाचा अनुशेष भरून काढत अवघ्या सहा महिन्यात अनेक विकास कामे मार्गी लावली त्यामुळे शेजारच्या डोंगरगण गावातही सरपंच सर्जेराव मते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी जेष्ठ नेते बबनराव पठारे, डॅनियल शिरसाट, अशोक घोरपडे, जालिंदर आढाव, संजय आढाव, अशोक पाटील मते, संतोषजी खेत्री, रामदासजी भुतकर, राजेंद्र भुतकर, जगन्नाथ खेत्री, दत्तात्रय काळे, यशवंत चांदणे, सचिन कदम, भास्कर मते, कुंडलिक भुतकर, पोपट गायकवाड, भरत खेत्री, अक्षय मते, विशाल भुतकर, कोंडीराम झरेकर, गमाजी मते, बाबासाहेब मते पाटील, दिलीप कदम, कैलास पाटील मते, प्रदीप पाटोळे, रामदास मते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.