कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायतचे शिपाई संजय धीवर हे कार्यालयीन वेळा मध्ये मद्यधुंद अवस्थेत राहत असून सध्या शाळा कॉलेज उघडल्याने पालकांची तसेच शेतकऱ्यांची ग्रामपंचायत मध्ये वर्दळ वाढली आहे त्या अनुषंगाने तेथील शिपाई हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत राहात असून तेथे गेलेल्या नागरिकांनी भाऊसाहेब केव्हा येणार आहे याबाबत चौकशी केली असता सदर शिपाई हा “मी काय त्याचा साहेब आहे का त्यांना जव्हा यायचं तेव्हा येतील असे उत्तरे देतो” तसेच तेथे आलेल्या नागरिकांशी अर्वाच्च भाषेमध्ये बोलणे तसेच शिवीगाळ करणे,अरेरावीची भाषा करणे तर काही लोकांकडे पैशाची मागणी करणे याबाबत संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजय शिवाजी पाटील हे सध्या ब्राह्मणगाव येथे कार्यरत असून त्यांच्याकडे सध्या कोकमठाण गावचा पदभार देण्यात आला असल्यामुळे ते दिलेल्या दिवशी फक्त ग्रामपंचायतमध्ये येऊन ते आपली कामे करतात.
मात्र हा शिपाई मागील अनेक महिन्यांपासून तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ड्युटी करत असल्यामुळे सदर ग्रामपंचायतने त्याचा असा ठराव केला की जोपर्यंत हा दारू सोडत नाही तोपर्यंत त्याला कामावर हजर करून घ्यायचे नाही व त्याचा पगार काढायचा नाही मात्र सदरचा शिपाई हा सकाळी ठरल्याप्रमाणे कार्यालयामध्ये येतो व तेथे बसून आलेल्या नागरिकांशी अर्वाच्च भाषेमध्ये बोलत असतो.
याबाबत ग्रामसेवक विजय पाटील यांच्याकडून आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता ते म्हणाले की सदर व्यक्तीस आम्हीच कंटाळलो आहे मागील सहा महिन्यापासून तो फक्त पंधरा ते वीस दिवसच हजर आहे त्याचा मागील महिन्याचा पगार ३०० रुपये निघाला असून या महिन्यामध्ये संपूर्ण २० दिवस तो गैरहजर दाखवण्यात आला आहे तो काम करत नसल्यामुळे आम्ही मानधन स्वरूपात जाधव नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी कामासाठी लावला असून तो ग्रामपंचायतची देखभाल करतो याबाबत कोकमठाण गावच्या सरपंच व संपूर्ण सदस्य यांना देखील याबाबतची संपूर्ण कल्पना असून मात्र कोणीही सदर व्यक्तीवर कारवाई करावी याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे आजपर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे शिपाई संजय धीवर याच्यावर कुणाचा वरद हस्त आहे ? कोण त्याला सांभाळून घेत आहे ? कोण त्याला पाठीशी घालत आहे ?याबाबत कोकमठाण गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.