29.3 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

रब्बी हंगामाकरिता पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या 10 जानेवारी पासून आवर्तन-खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर दि.८ प्रतिनिधी
 रब्बी हंगामाकरीता  पाण्यासाठी असलेल्या  शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून येत्या १० जानेवारी २०२३ पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.
मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पीकांची लागवड केली आहे.या पीकांना पाण्याची उपलब्धता व्हावी आशी मागणी शेतकरी तसेच पाणी वापर संस्थानी खा.डॉ सुजय विखे यांना भेटून  केली होती.त्यानूसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून खा.विखे पाटील यांनी आवर्तन सुरू करण्यास सांगितले होते.विभागाच्या निर्णयाचा  मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १० जानेवारी पासून सुरू होणार्या आवर्तनाचा लाभक्षेत्रातील राहुरी नेवासे शेवगाव पाथर्डी या तालुक्यातील अंदाजे २५ हजार हेक्टर क्षेत्रातील गहू कांदा मका या पीकांना  लाभ होण्याच्या दृष्टीने आवर्तनाचे ३५ दिवसांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लाभधारक शेतकऱ्यांची पाण्याची निकड लक्षात घेवून 
सध्या सुरू असलेल्या  बिगर सिंचन आवर्तनाला जोडूनच रब्बीचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या असल्याचे खा.डॉ विखे पाटील म्हणाले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!