वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या हल्ल्यास दोषी असलेल्या गृह विभागाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड च्या तालुकाध्यक्ष अर्चना शिंदे, जयमाला वाघ,भारती कदम, डॉ जयश्री महाडीक ,जयश्री जगदाळे,सत्यभामा वाघ,अनिता तांबे,मिना उगले,ज्योती कटारे,मंदा कुंदे,रेखा जगताप,अल्का चव्हाण आदीसह महिलांची उपस्थिती होती.



