टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रकारच्या विकास कामांचा धडाका सुरू असून मुख्य पेठेतील
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचा धडाका
डाॅ. जगताप यांचा दवाखाना ते रमेश काठेड यांच्या घरा पर्यंतचा रस्ता पेव्हिंग ब्लाॅक बसवून चकाचक करण्यात आला असून सदर कामांची पाहणी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील जेष्ठ नेते मंडळी यांनी केली आहे.
प्रामुख्याने गावातील मुख्य पेठेतील डॉ. जगताप यांचे घर ते रमेश काठेड यांचे घरापर्यंत पेव्हींग ब्लॉकचा रस्ता पूर्ण झाल्याने या परिसरात वेगळीच शोभा आली असून गावाच्या वैभवात भर पडली आहे. तसेच उर्वरित काम देखील लवकरच सुरू होऊन पेठेतील संपूर्ण रस्ता तसेच गवांतर्गत सर्व रस्ते हे पेव्हिंग ब्लॉकचे करण्यात येणार असल्याचे यावेळी बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी सांगितले.
गावातील मगर वस्ती तसेच दाभाडे मेजर यांच्या घराजवळ भूमिगत गटारीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांची देखील सुरुवात होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून ग्रामपंचायतला धन्यवाद दिले आहे. सध्या ग्रामपंचायत टाकळीभानच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि युवानेते करणदादा ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, सरपंच अर्चना रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना पवार, दत्तात्रय नाईक, यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, दत्तात्रय मगर, जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, रामकिसन गायकवाड, लोकसेवाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, शिवाजी पवार, श्रीधर गाडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गावातील मुख्य पेठेत पाहणी सुरू असतांना तेथील नागरिकांनी या रस्त्याला विठ्ठल-रुख्मिणी पथ असे नाव देण्याची मागणी केली आहे त्यामुळे पुढील मासिक मीटिंग मध्ये बहुमताने हा ठराव मंजूर करून “विठ्ठल-रुख्मिणी पथ” नाव देण्यात येईल असे सरपंच अर्चना रणनवरे यांनी सांगितले.