19.7 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

भगतसिंगांच्या प्रभावशाली विचारांचा वारसा जपावा – ससाणे

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व व थोर क्रांतिकारक भगतसिंग यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची व अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिल्याचे जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते.

ससाणे पुढे म्हणाले की क्रांतिकारक भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व समर्पित केले. त्यांनी आपल्या क्रांतिकारी धाडसाने आणि स्वातंत्र्याच्या अथक प्रयत्नाद्वारे ब्रिटिश वसाहतवादाला आव्हान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी भगतसिंग एक मानले जातात. एक निर्भय स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदर्शी नेता म्हणून त्यांचा वारसा भारताच्या इतिहासात खोलवर रुजलेला आहे. क्रांतिकारक भगतसिंग यांचे क्रांतिकारी धैर्य, बलिदान आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची अतुट बांधीलकी भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. यावेळी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मा. नगरसेवक के. सी. शेळके,सरवरअली मास्टर, अशोक जगधने, मिथुन शेळके, मंगलसिंग साळुंके,सुरेश ठुबे, युवराज फंड, रितेश एडके, संतोष परदेशी, रितेश चव्हाणके,सनी मंडलिक, सुनील साबळे, रियाजखान पठाण, निलेश बोरावके,भैय्याभाई अत्तार,योगेश गायकवाड, विशाल साळवे,आकाश जावळे आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!