15.7 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

सत्तेत नसताना ही जेवढे होतील तेवढे जास्तीत जास्त कामे करू आ. तनपुरे

 राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यात महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे सत्तेत असताना सत्तेचा पुरेपूर वापर विकास कामांसाठी केला असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविता आला याचे आत्मिक समाधान आपल्याला लाभले असून यापुढेही विविध विकास कामांना प्राधान्य असेल. सध्या राज्याच्या सत्तेत नसलो तरी आमदार म्हणून जितके काम करता येईल तितके करू असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.     

राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची विविध विकासकामे मार्गी लागल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार तनपुरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक के. एम. पानसरे होते. आमदार तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात माझ्याकडे सहा खात्यांची जबाबदारी होती त्या सर्व खात्यामार्फत मतदार संघासह राज्यात काम करण्याची संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती त्या संधीचे सोने करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आदिवासी मंत्री असताना कात्रड येथे आदिवासी कुटुंबांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून दिल्याने शबरी योजनेतून घरकुल व विविध योजनांचा लाभ मिळाला. ऊर्जा खात्याच्या मार्फत मोठा निर्णय घेऊन थेट वांबोरी सबस्टेशन मधून कात्रड साठी स्वतंत्र लिंक लाईन उभी केली. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उभारला या कामामुळे कात्रड व परिसराला पूर्ण दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. तसेच अनेक नवीन ट्रांसफार्मरची उभारणी मंत्रीपदाच्या काळात करण्यात आली.

त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायमच्या दूर झाल्या. आमदार निधीच्या माध्यमातून दयनीय अवस्थेत असलेले रस्ते कामास प्राधान्य दिले राज्यात सरकार बदलल्याने मागील सरकारच्या काळातील विविध विकास कामांना स्थगिती मिळाली या विरोधात पदरमोड करून उच्च न्यायालयात दाद मागितली व न्याय मिळवून घेतला याची आठवण करून देत आमदार तनपुरे यांनी सध्याच्या राजकारणावर विविध भाष्य केले.

कात्रड घोडेगाव रस्ता, वांबोरी ते कात्रड लिंक लाईन , दोन सभा मंडप व ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण ,जलजीवन मिशन अंतर्गत आदि कामे मार्गी लावल्याचे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सरपंच बाबासाहेब शिंदे ,उपसरपंच ऋषिकेश घुगरकर ,तबाजी सत्रे ,संदीप निकम ,भाऊसाहेब चौधरी ,साहेबराव दांगट, कारभारी पागिरे ,भाऊसाहेब घुगरकर ,रावसाहेब निकम ,नामदेव घाडगे, रावसाहेब घुगरकर ,सुंदरबापू गांधले ,कारभारी घुगरकर ,रमेश पागिरे, आसाराम ससाणे, कुक्कडवेढे गावचे सरपंच दीपक मकासरे शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, बाबासाहेब सोनवणे या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सभा मंडपासाठी राहुल एकनाथ चौधरी यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!