spot_img
spot_img

खाते वाटपाचा प्रश्न आज संध्याकाळपर्यंत निकाली निघणार

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा ):- अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री यांची शपथविधी होऊन दहा ते बारा दिवस होऊन गेले आहेत. परंतु अजून मंत्रिमंडळाची खाती वाटप झालेली नव्हती. आज खाती वाटपाचा मुद्दा हा निकालीच निघाला आहे. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव थोड्यावेळापूर्वी खाते वाटपाची यादी घेऊन राज्यभावनावर पोहोचले आहेत. या यादीवर राज्यपाल रमेश बेस यांची स्वाक्षरीकरताच खातेवाटप हे जाहीर करण्यात येईल. राजभावनामध्ये खातेवाटप यादी पोहोचण्याचा वृत्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप जाहीर होईल. त्यांना विचारणा करण्यात आली की, कोणाला कोणते खाते दिले यावर अजित पवारांनी सांगण्यास स्पष्ट नकार दिला.


 कोणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. ते देईल ते खाते आम्ही घेतो. आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. तेव्हा आम्ही एकत्र मिळवून काम करण्याची आमची जबाबदारी आहे असे अजित पवार म्हणाले. खाते वाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पवार गटाला अर्थ किंवा सहकार खाते मिळण्याची शक्यता आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!