राहाता( जनता आवाज
वृत्तसेवा ):-गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीची प्रक्रिया आता संपली असून कारखाना संचालक मंडळ कामाला लागले आहे, परंतु कारखान्यात कामगारांची कमतरता भासत आहे , त्यामुळे कारखान्याच्या विकासासाठी अनुभवी व जाणकारांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्यांना प्राचारण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते डॉ एकनाथ गोंदकर यांनी केले आहे .
शुक्रवारी कामगारांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कर्मचाऱ्याशी संवाद साधताना ते बोलत होते . यावेळी कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी शेतकऱ्यांना उसाच्या नोंदणीचे आव्हान करत आता तीन लाख टन ऊस गळीताचे उद्दिष्ट्ये ठेवल्याचे त्यांनी सांगितले . पुढे डॉ गोंदकर म्हणाले की, कारखान्याच्या विकासाला आता सुरवात होत आहे, त्यामुळे आता आम्ही कारखान्याविषयी अनुभवी तसेच जाणकार यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावणी करत आहे, काहींचे सहकार्य कारखान्यास लागणार आहे . सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काम करावे अशी विनंतीही त्यांनी केली .कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करून पुढील कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले .
कारखान्यातील पुरवठा विभागातील कर्मचारी दत्तात्रय बावके, नारायण वाकचौरे, रावसाहेब शेळके या कर्मचाऱ्यांना कामावर कायम थांबण्याची विनंती डॉ गोंदकर व इतर संचालकांनी केल्यामुळे त्यांनी कामावर राहण्याचे मान्य केले आहे .त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत .
यावेळी चेअरमन सुधीर लहारे, व्हा चेअरमन विजय दंडवते, काँग्रेस नेते डॉ एकनाथ गोंदकर, संचालक अनिल गाढवे, मधुकर सातव, चिटणीस नितीन भोसले, संगमनेरचे कार्यकारी संचालक घोगरकर , संजीवनी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिवटे साहेब तसेच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .