नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील सुरेशनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती देताना सरपंच कल्याणराव उभेदळ यांनी असे सांगितले की आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.
यावेळी सरपंच कल्याणराव उभेदळ, उपसरपंच भागचंद पाडळे, विठ्ठलराव पाषाण,तंटामुक्तीचे अध्यक्ष साहेबा सावंत, भीमा चव्हाण, भगवान दळवी, सुदाम चव्हाण, अशोक खंडागळे, जिजा उभेदळ,दिलीप शेटे, अशोक साळुंखे, प्रमोद उभेदळ, आशुतोष पुंड, संतोष शेटे, हर्षद पाटील, विजय बाबर, सचिन शेगर, प्रदीप भनगे, विजय उभेदळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उदे गुरुजी आदि सुरेशनगरचे ग्रामस्थ व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.