कोपरगाव (प्रतिनिधी ):- राज्यातील स्थानिकसंस्थांच्या निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
शहाजापूर येथे बाजार समितीच्या पदाधिकारी व संचालकांच्या सत्कारप्रसंगी आमदार काळे बोलत होते. अध्यक्षस्था
नी माजी आमदार अशोक काळे होते. आमदार काळे म्हणाले की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निवडणुक परवडणारी नव्हती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले; परंतु दुर्दैवाने निवडणूक झाली. मात्र सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवारांची निवड करून पक्षनिष्ठा जपली. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीचे वार्षिक
उत्पन्न वाढवावे, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी माजी आमदार अशोक काळे यांनी उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक संजय शिंदे, राजेंद्र निकोले, शिवाजी देवकर, रामदास केकाण, ऋषिकेश सांगळे यांचा सत्कार केला. या सोहळ्यास कारभारी आगवण, बाळासाहेब कदम, एम. टी. रोहमारे, नारायण मांजरे, सोमनाथ चांदगुडे, माधवराव खिलारी, उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, गोरक्षनाथ जामदार, धरमचंद बागरेचा, देवेन रोहमारे, बाबासाहेब कोते आदी मान्यवरांसह कर्मवीर काळे उद्योग समूहाचे चेअरमन, संचालक मंडळ, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी तर सूत्रसंचालन अरुण चंद्रे व संदीप लासुरे यांनी केले. आभार दिलीपराव बोरनारे यांनी मानले.
बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संजय माधवराव शिंदे यांनी माजी आ. अशोक काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे आ. काळे यांची ताकद वाढली आहे.