अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या एकास गावकऱ्यांनी पकडले. मात्र गावातील एक कुटुंब हे चोराच्या परिचयातील असून त्यांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगरमधील पांगरमल या गावात घडली आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल गावात आलेल्या एका चोराला गावकऱ्यांनी पकडले. त्याला पकडल्यानंतर त्याच गावात राहणाऱ्या कुटुंबाचा हा चोर ओळखीचा असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. यामुळे गावकऱ्यांनी त्या कुटुंबाला रात्री घरातून उठवून मारहाण करत ग्रामपंचायतीसमोर आणले. या मारहाणीत चांगदेव चव्हाण (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची भावजाई आणि अल्पवयीन पुतण्यास जबर मारहाण करण्यात आली आहे.
तर घटनेतील महिलेने आपणास गावातून मारहाण करत ग्रामपंचायतीसमोर आणून जबर मारहाण करून विनयभंग केला असल्याचा आरोप केला आहे. अहमदनगर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
याप्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केली आहे.
पांगरमल येथे शेळ्या चोरीच्या संशयावरून एका पारधी समाजाच्या तरुणाचा खून करणे हे निंदनीय आहे. काही वर्षांपूर्वी पांगरमल येथे विषारी दारूच्या सेवनाने काही लोकांचा मृत्यू झाला होता. घटना राज्यभर गाजली होती. त्यामुळे आता या घटनेने पुन्हा पांगरमल हादरले आहे. त्यातच मयत झालेल्या तरुण बुधवारी रात्री शेळ्या चोरून नेल्याच्या संशयावरून एका महिलेसह चौघांना गावातील वीस पंचवीस जणांच्या जमावाने बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.