22 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोदावरी कालव्यांच्या नूतनी करणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा  उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विखे पाटील यांनी घेतली भेट!

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-गोदावरी कालव्यांच्या नूतनी करणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्य मंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

ब्रिटीश कालवे म्हणून गोदावरी कलव्याची ओळख वर्षानुवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धता करून देण्यात आली होती.त्यानंतरही दुर्लक्षित झालेल्या गोदावरी कालव्यांची दुरूस्ती होत नसल्याने गोदावरी धरण समूहातून सोडण्यात येणारे आवर्तन लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहचण्यास मोठा कालावधी लागतो.यावरून पाण्याचे संघर्षही निर्माण शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष विभागावर आणि सरकारवर येतो ही वास्तविकता मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

कालव्याच्या दुरूस्ती करीता निधी उपलब्ध झाल्यास कालव्याची काम वेगाने पूर्ण होतील आणि पाण्याच्या आवर्तनातील सर्व अडथळे दूर झाल्यास शेवटच्या गावापर्यत पाणी विनाविलंब पोहण्यास मोठी मदत होईल याकडे उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यात आले.

गोदावरी कालव्यांचे क्षेत्र खूप मोठे असून नासिक नगर जिल्ह्यातील जिल्ह्यातीलस तालुक्याची सिंचन व्यवस्था या कालव्यांवर अवंलंबून आहे. त्यामुळेच कालव्याची झालेली जीर्ण आवस्था आणि कालव्या मध्ये असलेले अडथळे तातडीने काढून टाकणे गरजेचे आहे.यासाठीच निधी उपलब्ध करून द्यावा या मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या मागणील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!