22.7 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित गीत गायन व नृत्य स्पर्धेत पीएम श्री नगरपालिका शाळा क्र-७ ने प्रथम क्रमांक पटकाविला  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा नगरपालिका शाळेतूनच होतो- उपमुख्याधिकारी आय्यूब सय्यद

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- 15 ऑगस्ट  रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीरामपूर नगरपालिकेने शालेय गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक- ०७ यातील मुलांनी नृत्य अविष्कारातून वेगवेगळी योगासने दाखवून उपस्थितांचे मने जिंकली व प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सदर कार्यक्रमास श्रीरामपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी श्री अयुब सय्यद, प्रशासन अधिकारी श्री संजीवन दिवे, ग्रंथपाल स्वाती पुरे, शिक्षण मंडळाचे किशोर त्रिभुवन रुपेश गुजर संभाजी त्रिभुवन सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक नागरिक व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात उपमुख्याधिकारी श्री अयुब सय्यद यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो नगरपालिका जिल्हा परिषद शाळेतूनच शक्य असल्याचे नमूद केले व सर्व विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून कौतुक केले.

प्रशासनाधिकारी श्री संजीवन दिवे साहेबांनी उपस्थित नागरिकांना आपले पाल्य नगरपालिका शाळेत टाका त्यांच्या सर्वांगीण विकासाची हमी आम्ही देतो असे आवाहन केले नगरपालिका शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, सर्व शाळा डिजिटल झालेल्या आहेत, अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग उपलब्ध आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी नगरपालिका शाळेमध्ये आपल्या पाल्यांना घातले पाहिजे असे आवाहन केले.

या स्पर्धेत मुलांना मिळालेल्या यशासाठी अध्यापिका सौ वर्षा वाकचौरे मुख्याध्यापिका कल्पना जगताप श्री प्रशांत पठाडे सर श्री अजय धाकतोडे सर यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक सात या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेमध्ये नगरपालिका शाळा क्रमांक-७ शाळेची निवड झाली असल्याकारणाने शाळेमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. व शाळा ग्रीन स्कूल बनलेली आहे. शाळा डिजिटल बनली आहे, शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे, शाळेला नव्याने कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब,ग्रंथालय मंजूर झालेले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी या शाळेतून होणार आहे त्यामुळे आपल्या पाल्यांना सदर शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समितीने केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!