29.1 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

…तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करु – आ. कानडे अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी सुरु असलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- सरकार नेहमीच जनकल्याणाचे निर्णय घेते. माञ प्रशासनात पगार घेवुन काम करणारी यंञणा योग्य काम करीत नसल्याने जनतेत आक्रोश निर्माण होत आहे. वास्तविक सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा शासन निर्णय यापुर्वी तीन वेळा झालेला असतानाही सरकारी बाबु त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने घरकुलांचे प्रश्न निर्माण होवुन जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. याबाबत येत्या १५ दिवसात योग्य निर्णय घ्यावा, अन्यतः मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करील, असा खणखणीत इशारा आ. लहु कानडे यांनी येथे सुरु असलेल्या उपोषणस्थळी भेट देवुन दिला. यावेळी पाञ अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे लेखी आश्वासन तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्याने आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले.

सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करुन लाभार्थ्यांना हक्काचे उतारे द्यावेत व घरकुलाचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी १४ आॕगष्टपासुन अमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाला दररोज जिल्ह्यातुन पाठींबा वाढत होता. उपोषणाच्या काल सहाव्या दिवशी आ. कानडे, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांनी उपोषणार्थिंची भेट घेतली. यावेळी आ. कानडे म्हणाले कि, पगार घेवुन प्रशासनात काम करणारी यंञणा योग्य काम करीत नसल्याने जनतेत आक्रोश निर्माण होत आहे.

सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा शासन निर्णय १९९५, २०११ व २०१८ रोजी झालेला आहे. माञ प्रशासनात काम करणारी यंञणा या निर्णयाची अंबलबजावणी करीत नसल्याने जनतेत आक्रोश वाढत आहे. या प्रश्नासाठी तालुक्यातील ५२ गावाची अतिक्रमणाची माहीती संकलीत करुन २६ आॕगष्ट रोजी प्रशासनातील अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची एकञीत बैठक घेवुन पाञ लाभार्थ्यांची अतिक्रमण नियमानुकुल करुन घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. ज्यांची अडचण असेल त्यांची जनसुनावणी घेवुन मार्ग काढावा. सर्व पुर्तता होवुनही प्रश्न मार्गी लागत नसेल तर आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी स्वताः अमरण उपोषण करील, असा इशारा आ. कानडे यांनी यावेळी दिला. यावेळी आ. कानडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यांशी संपर्क साधुन आंदोलनाची तिव्रता वाढत आसल्याचे सांगत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना केल्या.

यावेळी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ व गटविकास आधिकारी प्रविण सिनारे यांनी पाञ लाभार्थ्यांना अतिक्रमणाचा व घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शिंदे यांनी उतस्थितांच्या हस्ते सरबत घेवुन सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले. यावेळी भैरवनाथ नगरचे प्रविण फरगडे, केसापुरचे दादापाटील मेहञे, भोकरचे प्रताप पटारे, टाकळीभानचे यशवंत रणनवरे, ब्राम्हणगाव वेताळच्या मनिषा शिंदे, नायगावचे राजाराम राशिनकर, रामपुरचे नितिन शिंदे, सरपंच, उपसरपंच व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र कोकणे, जयकर मगर, बंडोपंत बोडखे, अबासाहेब रणनवरे, अनिल कोकणे, अनिल बोडखे, सुदामराव पटारे, शरद रणनवरे, उमेश ञिभुवन, भागवत रणनवरे, बंडुतात्या कोकणे, मधुकर गायकवाड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, विजय चर्हाटे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, तलाठी कचेश्वर भडकवाल व तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!