35.3 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

ज्येष्ठांच्या ज्ञानाचा सर्वांनी उपयोग करावा – सौ शालिनीताई विखे पाटील 

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे ज्येष्ठांच्या या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्वांनी करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

बहि:शाल शिक्षण मंडळ ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने वक्ते, ग्रंथ अन्वेषक आणि केंद्र कार्यवाह यांचे संयुक्त कृतिसत्र आयोजित कृतिसत्रच्या उद्घाटन प्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.

यावेळी बहि : शाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक डॉ हरीश नवले, सहायक कुलसचिव डॉ अजय ठुबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,महाविद्यालयांच्या प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे आदी ही उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणल्या आज विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होण्याची गरज आहे.मुलांवर संस्कार होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन कररुन यातून विचारांची देवाण घेवाण होण्यासाठी विद्यापीठांचा हा उपक्रम महत्वपुर्ण असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनुश्री खैरे, यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जया डबरासे यांनी केले. संयोजन प्रा. अर्चना घोगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ कांचन देशमुख, प्रा संजय वाणी, प्रा रुपाली नवले, प्रा. सुरेखा जाधव, प्रा. महेश गायकवाड, प्रा. राजश्री नेहे , सुनील अल्हाट आदींनी परिश्रम घेतले. या कृतिसत्रसाठी नगर जिल्हातील दीडशे वक्ते, ग्रंथ अन्वेषक आणि केंद्र कार्य वाह उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!