spot_img
spot_img

वाळुंज येथील सरपंचांच्या मुलाला लाच घेताना अटक

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज येथील सरपंचांच्या मुलाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

सदर तक्रारदार हे सहकारी संस्थेचे सभासद असून ठेकेदारीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना वाळुंज ग्रामपंचायतच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे टेंडर बांधकाम विभागाकडून सहा महिन्यापूर्वी मंजूर झाले होते.

सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना दहा लाखाचे बील शासनामार्फत मंजूर झाले होते. सदर कामाच्या पूर्णत्वाचा दाखला वाळुंज ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून तक्रारदार यांना हवा होता तो दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांचा मुलगा मकरंद हिंगे यांनी सरपंचांची सही घेऊन देण्याकरीता सरपंच यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1,00,000/- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.02 रोजीला.प्र.वि. अ.नगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.02रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.

लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी (खाजगी इसम)मकरंद गोरखनाथ हिंगे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 1,00,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 45,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करूनपहिला हप्ता म्हणून 25,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!