35.4 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

रस्त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे ३२ गावातील दळणवळण सुलभ – आ. कानडे

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या चार वर्षात मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये आपण आम्ही जाणीवपूर्वक नियोजन करून कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. रस्त्यांच्या कामामुळे दळणवळण सुलभ होऊन एक विकासाची वाट तयार झाली आहे. जी कामे राहिली आहेत, ती पुढील काळात कशी करता येतील, हे जाणून घेण्यासाठी हा संवाद दौरा आहे. या परिसरातील वांजुळपोई सबस्टेशनमुळे वांजुळपोई व परिसरातील शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. कानडे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्यात राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, खुडसरगाव, मालुंजा खुर्द, माहेगाव व महाडूक सेंटर या गावातील बुथ कमिटी सदस्य, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. उद्योजक अंकुश कानडे, अमृत काका धुमाळ, विष्णुपंत खंडागळे, नानासाहेब रेवाळे आदीसह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आ. कानडे म्हणाले, राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या वारंवार अडचणी येत असल्याने या परिसरात सबस्टेशन उभारण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली होती. त्यासाठी आपण तत्कालीन ऊर्जामंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून वांजुळपोई येथे सबस्टेशन मंजूर केले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची विजेची अडचण दूर झाली आहे. मागील १० वर्षात ३२ गावात कोणतीच विकास कामे झाली नाहीत. मात्र गेल्या ५ वर्षात आ. तनपुरे यांच्या सहकार्याने विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

तालुक्यातील रस्ते, विज, पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यासह जलजीवन योजना, तलाठी कार्यालय, बस स्थानक, शाळांना एलएफडी, गावागावात व्यायाम साहित्य दिले. अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत. ती जाणून घ्यायची आहेत. याशिवाय तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरविला की नाही याबाबत तुमचे मत या दौऱ्यातून जाणून घ्यायचे आहे. काँग्रेस पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी बुथ कमिट्या व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अजित धुमाळ, दिलीप इंगळे, नितीन धुमाळ, जालिंदर धुमाळ, सचिन घोलप, बाळासाहेब भुजाडी, अशोक भुजाडी, बबन थोरात, बाळासाहेब पवार, शिवाजी माने, दिगंबर आहेर, मिठूभाई शेख, बाळासाहेब घाडगे, शरद पवार, आबासाहेब पवार, सतीश पवळे, युवराज पवार, सोमनाथ देठे, गणेश निशाणे, सुनील पवार, ज्ञानेश्वर नवाळे, लक्ष्मण गायकवाड, डॉ. सर्जेराव सोळुंके, रामभाऊ सोळुंके, नारायण रिंगे, आप्पासाहेब पवार, अशोक बोरुडे, रामभाऊ सोळुंके, आप्पासाहेब झारेकर, किशोर बोरुडे, आप्पासाहेब सोळुंके, सोपान लोखंडे, राधाकृष्ण बोरुडे, संदीप पवार, भाऊसाहेब थेवरकर, पाराजी पवार, संदीप मुंगसे, राधाकिसन बोरुडे, शिवाजी पवार, किरण साळवे, सुभाष गायकवाड, सुरेश गाडे, अमोल पवार, अण्णासाहेब गलांडे, संदीप कवडे, इसाक पठाण, बाळासाहेब साळवे, राधाकिसन बोरुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!