लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-संताचे विचार जनत करत पुढे जातांना वारकरी संप्रदायामुळे जीवन आनंदी होत असते.सप्ताहातून गावचा एकोपा कायम ठेवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
दुर्गापुर (ता राहाता )येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी भेट देऊन भाविकांशी संवाद साधतांना बोलत होत्या. यावेळी ह.भ.प. अमोल महाराज गाढे,ह.भ.प मुकेश महाराज तांबे,ह.भ.प. नारायण महाराज उबाळे,रामेश्वर महाराज,दत्ता महाराज,ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनिलराव जाधव,सरपंच नानासाहेब पुलाटे,उपसरपंच नबाजी रोकडे,मच्छिंद्र जाधव,कचरु पुलाटे,बाबासाहेब पुलाटे, आदीसह भाविक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणाल्या,संताची मोठी परंपरा आपल्या लाभली आहे.संताच्या विचारांचा वारसा जतन करा. त्यांचे विचार आत्मसात करा.देवावर श्रध्दा ठेवा पण अंधश्रध्दा ठेऊ नका.जीवनात खुप मोठे व्हा पण संताचे विचार सोडू नका.या विचारातूम एकोपा कायम ठेवा असे सांगून वारकरी संप्रदायातून खरा आनंद मिळतो यासाठी गावोगावी होणारे सप्ताह ही अध्यात्मिक उर्जाचे साधन आहे.
अमोल महाराज गाढे यांनी संताचा सहवास हा जीवन घडवित असतो.विखे पाटील परिवार हा चायमचं संत मंहताच्या मागे उभा असतो. वारकरी संप्रदायास नेहमीचं त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.कार्यक्रमाचे सुञसंचालन आणि आभार ह.भ.प मुकेश महाराज तांबे यांनी मानले.