18.5 C
New York
Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

ना. राधाकृष्ण विखे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना सायकल वाटप करीत जपली सामाजिक बांधिलकी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील मित्र मंडळ कोल्हार भगवतीपुर यांचा स्तुत्य उपक्रम  

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघात दुर्घटनेतील सर्व 256 मृत व्यक्तींच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी ना. विखे साहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला त्याचा मान ठेवत कोल्हार भगवतीपुर येथील युवकांनी प्रवरा परिसराला एक नवीन आदर्श उदाहरण देत गावापासून लांब अंतरावर वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या 26 गरजू विद्यार्थ्यांना सुमारे 4500 किमतीच्या सव्वा लाख रुपयांच्या सायकलचे वाटप मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते दि. 15 जून रोजी येथील जि प शाळेच्या भव्य प्रांगणात सकाळी ठीक 10 वा. केले. 

याप्रसंगी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पा., भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे पा., कृषीभूषण राजेंद्रशेठ कुंकूलोळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीने डॉ. सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी नामदार विखे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन स्वागत तसेच प्रास्ताविक केले. हा स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेऊन ना. साहेबांवरील प्रेम व्यक्त करून येथील तरुण युवकांनी प्रवरा परिसराला एक नवीन आदर्श घातल्याचे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी त्यांचे विशेष कौतुक केले.

प्रत्येकाने महापुरुषांच्या कार्याला शोभेल अशाच प्रकारचे कार्यक्रम यापुढे घेतले पाहिजे आणि त्यामुळेच समाजाला देशाला व पर्यायाने गावाला दिशा मिळते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. दरम्यान नामदार विखे साहेबांनी कोल्हार भगवतीपुर गावच्या विकासासाठी जी पावली उचलली त्यावर प्रकाश टाकताना त्यामध्ये जि प शाळेचे नूतनीकरण करून बीटीओ तत्त्वावर अद्यावत जि. प. शाळा बांधली,तसेच उर्दू शाळेचे नूतनीकरण करून रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करून डिजिटल बोर्ड दिले.दोन्ही शाळा मिळून 20 सीसीटीव्ही देऊन ते कार्यान्वित केले. तसेच कोल्हार येथील घनकचऱ्याचा प्रश्न देखील येत्या तीन महिन्यात मार्गी लावून कोल्हार गाव हे कचरा मुक्त करण्याचा शब्द त्यांनी दिला.

तसेच येथील बाजारतळाचे ठिकाण नव्याने करण्याचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच येथील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून त्यावर स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम केवळ नामदार साहेबांमुळे झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच येथील सब स्टेशनच्या नवीन जागेचा निर्णय देखील लवकरच घेणार असल्याचे सांगून गावचा सर्वांगीण विकासासाठी विखे पाटील परिवार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पदाचा वापर हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार असल्याचे सांगत गावांमधील ज्या ज्या कुटुंबांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजना मंजूर झाली असेल त्या सर्वांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत 5 ब्रास वाळू घरपोच केली जाईल असे नियोजन येथील तरुणांना हाती घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या एक वर्षाच्या आत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा देखील याच ठिकाणी करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. आपल्याला कोणी अशक्य म्हणत असलेलले काम करण्यास खूप आनंद होतो त्यासाठी त्यांनी कोऱ्हाळे गावचे उदाहरण दिले कोऱ्हाळे गाव हे निळवंडे कालव्यापासून सुमारे 150 फूट उंचीवर आहे तिथे पाणी पोहोचविणे केवळ अशक्य वाटत असताना मंत्रिपद मिळाल्यानंतर केवळ तीन महिन्याच्या आत पाणी गावात पोहचवले आणि नंतरच तिथे सभा घेतल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे याबद्द्दल कौतुक केले.

याप्रसंगी अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरलेले असंख्य वाचकांचे आवडते सुप्रसिद्ध वृत्तपत्र दैनिक जनता आवाज या वृत्तपत्राने महाराष्ट्र राज्याचे लाडके जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या अखंड बारा पानी विशेष आवृत्तीचे उपस्थित जनतेत वाटप करून आनंद द्विगुणीत केला.

कोल्हार भगवतीपुर येथील माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील मित्र मंडळाचे उद्योजक, डॉ. नितीन कुंकूलोळ, पद्मश्री वि.वि. पा. सहकारी साखर कारखानाचे माजी संचालक स्वप्निल निबे पाटील , पद्मश्री वि.वि. पा. सहकारी साखर कारखानाचे संचालक श्रीकांत खर्डे पाटील, माजी ग्रामपंचायतचे सदस्य कोल्हार बु पंढरीनाथ खर्डे पाटील, महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे पाटील, कोल्हाळेश्वर पतसंस्था चेअरमन भरत उर्फ आबा खर्डे पाटील, पद्मश्री वि.वि. पा. सहकारी साखर कारखानाचे माजी संचालक धनंजय दळे पाटील, भाजप युवा मोर्चाचे नेते साईनाथ खर्डे, सामाजिक कार्यकर्ते अमोल थेटे पाटील यांनी सायकल वाटप उपक्रमात योगदान दिले तसेच येथील उद्योजक सुरेशशेठ रांका(नमोह सायकल मार्ट) यांनी देखील प्रोत्साहनपर एक सायकलचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोळसे यांनी केले.

याप्रसंगी कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच, प्रकाश खर्डे,देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, देवालय ट्रस्ट विश्वस्त संभाजी देवकर, डॉ.वि.वि.पा.सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेर, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी,उद्योजक अतुल रांका,निलेश शिंगवी, विजय डेंगळे, डॉ. श्रीकांत बेंद्रे,केतन लोळगे,असीर पठाण , अजुभई पठाण ,सुमीत कापसे, ॲड.भरत घुले, आप्पासाहेब टेकाडे, ज्ञानेश्वर शेळके, योगेश बोरुडे, अक्षय मोरे, वसंतराव मोरे, शरद (नाना) खर्डे पाटील, नाना कडसकर, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!