कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार बुद्रुक येथील मना बाबा मळ्यामध्ये आज दिनांक १७ जून २०२५ रोजी ऊस शेती व सेंद्रिय शेती यावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन कुषक गटाचे सदस्य श्री. कल्याण पाटील खर्डे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यशाळेला कृषी अधिकारी श्रीमती विनया बनसोडे (राहाता), ज्ञानेश्वर पाटील खर्डे (संचालक, विखे पाटील कारखाना प्रवरानगर), कोल्हार बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सविताताई खर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मना बाबा मळ्यातील अनेक महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात ऊस शेती कशी फायदेशीर होऊ शकते, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. रोपवाटिकेपासून थेट लागवड केल्यामुळे मजुरी व आर्थिक खर्च कसा कमी करता येतो हे कृषी अधिकारी श्रीमती बनसोडे यांनी साध्या भाषेत समजावून सांगितले.
तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जैविक खतांचा वापर, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचे उपाय, व सेंद्रिय ऊस उत्पादन वाढवण्याचे धोरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही प्रश्न विचारून सहभाग दर्शवला.यावेळी श्रीमती विनया बनसोडे, कृषी अधिकारी राहता श्री विनय भाकरे उप कृषी अधिकारी लोणी श्रीमती वैशाली अडसुरे उप कृषी अधिकारी लोणी कु. मीना जाधव सहाय्यक कृषी अधिकारी कोल्हार बु प्रगतीशील शेतकरी भागवत पाटील शेळके दिनेश पाटील खर्डे व इतर सर्व प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या उपक्रमानंतर ज्ञानेश्वर पाटील खर्डे यांनी सांगितले की, नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाण्याचा संकल्प केलेला आहे या उपक्रमातून प्रेरणा घेऊन कोल्हार बुद्रुक येथील प्रत्येक वस्तीवर अशाच कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय ऊस शेतीकडे वळतील.”