spot_img
spot_img

दोन दिवसांत आरक्षण द्या, तरच उपोषण मागे घेऊ- जरांगे, सरकारकडून एक महिन्याची मुदत मागितली सरकार व आंदोलकांमधली चर्चा निष्फळ ठरली

जालना (जनता आवाज वृत्तसेवा):- जालना येथील मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू होते. दोन दिवसांपूर्वी अंतरावली सराटी या गावात पोलिसांनी आंदोलकावर लाठी चार्ज केला. यामुळे तेथील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण असल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याकरिता आंदोलकांची व सरकारच्या चर्चासत्र सुरू झाले. परंतु याच्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारच्या वतीने आमदार नितेश राणे व नामदार गिरीश महाजन हे दोघे जण चर्चा करण्यासाठी आले होते.

परंतु यावेळी दोन दिवसांत आरक्षण द्या, तरच उपोषण मागे घेऊ, असा ठाम पवित्रा जरांगे यांनी घेतला. त्यावर दोन दिवसांत आरक्षण शक्य नसल्याचं सांगत महाजन यांनी एक महिन्याची मुदत मागितली. सोबतच आंदोलकांवर झालेला लाठीमार अमानुष असल्याचं सांगत समिती नेमली असली तरी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रक्रियेला खीळ बसल्याचं गिरीश महाजन म्हणाले. एकूणच सरकार आणि मराठा आंदोलकांनी चर्चा निष्फळ ठरलीय.

जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासह अनेकांनी भेट दिली. आज राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, नितेश राणे हे जालन्यात पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पण मनोज जरांगे यांनी दोन दिवसात मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यावर दोन दिवसात हे शक्य नसून त्यासाठी एका महिन्याचा वेळ द्यावा अशी विनंती केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यसरकार कटीबद्ध असून आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती महाजन यांनी केली.

उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं जरांगेंनी सांगितलं. मात्र आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!