कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- दहीहंडी सामाजिक भानाची..!!दहीहंडी दुष्काळ परतवन्याची..!!संस्कृतीला छेद न देता अखंडपने सुरू असणारी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी उत्साहात पार पडते.सध्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा सुरू आहेत.शेतकरी कष्टकरी आणि उद्योग व्यापारी अडचणीत येत आहेत.त्या पार्श्वूमीवर दहीहंडी उत्सव हा साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी कष्टकरी मोठ्या संकटातून जात आहे.त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी प्रार्थना करण्यासाठी विघ्नेश्वर मंदिर कोपरगाव येथे ३ ते ६.३० पर्जन्य याग यज्ञ संपन्न होणार आहे.त्या वेळी पूर्ण आहुती देण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ६.३० वाजता उपस्थित रहावे.त्यानंतर हिंदू सणाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे पार पडेल असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठान दहीहंडी कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी २०२३ कमिटी अध्यक्ष स्वप्नील दिलीप मंजुळ,कार्याध्यक्ष आकाश बबनराव वाजे,उपाध्यक्ष समाधान कुऱ्हे,स्वराज सुर्यवंशी,व्यवस्था प्रमुख अर्जुन भगवान मरसाळे,सचिव रविंद्र लचुरे,रुपेश सिनगर,ओम योगेश बागुल,सहसचिव नरेंद्र गोकुळ लकारे,दत्तात्रय कोळपकर,समीर खाटीक,सदस्य – ईलियास शेख,अनिल जाधव,अजय गायकवाड,सिध्दार्थ पाटणकर,भैय्या नागरे,वैभव सोळसे,अभि सुर्यवंशी,अमोल बागुल,समीर सुपेकर,मोनु म्हस्के आदी उपस्थित होते.



