अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):-भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसा वेग वाढल्याने आज धरण ५० टक्के भरले आहे. निळवंडे धरणात पाणीसाठा जलद वाढण्यास मदत होत आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला. पाऊस असाच सुरू राहीला तर ही दोन्ही धरण जुलै अखेर पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास आदिवासी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुळा नदीवरील अंबित १९१ दलघफूट सर्वप्रथम व तद्नंतर पिंपळगाव खांड प्रकल्प ६०० दलघफूट , कोथळे १८३ दलघफूट शिरपुंजे १५५ दलघफूट असलेले धरण ओव्हर फ्लो झाले. तर कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय १०२ दलघफूट व प्रवरा नदीला मिळणाऱ्या टिटवी शिवारातील ३०३ दलघफूट क्षमतेचे टिटवी लघुबंधारा पुर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने ओसंडून वाहत आहे. हे पाणी पुढे प्रवरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणीसाठा झपाट्यने वाढत आहे. गुरुवार सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठ ५४२१ दलघफूटवर झाला.
गुरुवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस मिलिमीटरमधे असा आहे. कंसात या पावसाळ्यात झालेला एकूण पाऊस आहे. घाटघर 89 रतनवाडी 101, भंडारदरा 75 पांजरे 78 सुमारे एक आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचे भात आवणीस लवकरच वेग येणार आहे. धरण पाणीसाठा मध्ये झपाट्याने वाढ असल्याने शाखा अभियंता प्रवीण भांगरे, वसंत भालेराव लक्ष ठेऊन आहे.