15.3 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रेयसी सोबत राहण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीनेच केला प्रियकराचा खून मांडवे येथील खून प्रकरणाचा अवघ्या तीनच दिवसात घारगाव पोलिसांनी केला उलगडा

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील एका सभामंडपात झालेल्या खुन प्रकरणाचा अवघ्या तीनच दिवसामध्ये घारगाव पोलिसांना उलगडा करण्यात यश आले असून, प्रेयसी जयश्री हिच्या बरोबर राहण्यास नकार दिला या कारणा वरुन संतप्त झालेल्या प्रियसी जयश्री हिनेच प्रियकर असलेला भाऊसाहेब बाचकर यांच्या डोक्यात टनक वस्तू टाकून खून केला असल्याचे उघड झाले आहे. तिला घारगाव पोलिसांनी नेवासा तालुक्यातील कायगाव टोका येथे संभाजीनगरकडे पळून जात असताना पकडत तिला बेड्या ठोकल्या.

संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात हे मृतदेहाची ओळख पटवत असताना तो मृतदेह भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (रा. जांभुळबन, ता. राहुरी) यांचा असल्याचे उघड झाले त्यानंतर मयत भाऊसाहेबची पत्नी व नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता भाऊसाहेब बाचकर व जयश्री काकासाहेब चव्हाण (रा. काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यामध्ये मागील तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्यामुळे ते दोघेही अहिल्या नगर येथे राहत होते.

,११ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भाऊसाहेब हा पत्नी व मुलाबाळांना भेटण्यासाठी साकूर येथे आला होता. तेव्हा त्याच्या सोबत जयश्री देखील होती. तेव्हा पत्नी योगिता बाचकर हिस “त्याने साकूर येथे बोलावून घेत मला आता जयश्री सोबत राहायचे नसून यापुढे मला तुझ्या सोबत राहयांचे आहे. याचा राग आल्याने जयश्री भाऊसाहेब यास म्हणाली,तुला माझ्या सोबत राहावे लागेल नाहीतर मी तुला जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्या नंतर भाऊसाहेब यास जयश्री ही मोटार सायकलवरुन घेवून शिवप्रभा ट्रस्ट येथे गेली. त्यानंतर तिने टणक हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करुन खून करुन फारार झाली होती.

या खून प्रकरणाचा तपास करताना जयश्री काकासाहेब चव्हाण हिने तिचे पती काकासाहेब शंकर चव्हाण यास फोन करुन नेवासा फाटा येथे बोलविले असल्याची गुप्त माहिती एका खाबऱ्या मार्फत घारगाव पोलिसांना मिळाली त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व महिला पोकॉ. अमृता नेहरकर यांच्या पथकाने नेवासाफाटा जवळील कायगाव टोका येथे जाऊन जयश्री हिस ताब्यात घेतले आणि घारगावला आणले तिच्याकडे भाऊसाहेब बाचकर यांच्या खुनाविषयी विचारले असता अगोदर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर तिला पॉलिसी खाकी हिसका दाखवतात तिने आपणच भाऊसाहेब बाचकर यांचा खून केला असल्याची कबुली दिली.

तिला संगमनेर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शाना खाली केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!