spot_img
spot_img

राम राज्य आल्याशिवाय आणि समान नागरी कायदा झाल्यावर या देशाला पुनर्वैभव प्राप्त होईल- अश्विनी कुमार उपाध्याय

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राम राज्य आल्याशिवाय आणि समान नागरी कायदा झाल्यावर या देशाला पुनर्वैभव प्राप्त होईल. महिला आरक्षणामुळे लोकशाही अधिक बळकट होईल” असं मत सर्वोच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकील व वक्फ बोर्डाचे, समान नागरी कायद्याचे व काश्मीर प्रश्नाचे गाढे अभ्यासक अश्विनी कुमार उपाध्याय यांनी व्यक्त केले.

विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय नेते अश्विनी कुमार यांनी आज नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील पैस खांबाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अनामिक ऊर्जा आपल्याला प्राप्त झाल्याचे अश्विनी कुमार यांनी सांगितले. सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनिल ताके , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतिष मुळे आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर गारुळे, रविंद्रकुमार गुप्ता यांनी अश्विनी कुमार यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!