लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-छोट्या छोट्या गोष्टींपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदूषणासाठीची धोरणे ही . मानव केंद्रित आणि जीवसृष्टी केंद्रित होण्यासाठी झाली पाहिजे. त्यासाठी सर्व पातळ्यांवरून दबाव वाढवणे आवश्यक आहे. असा दबा वाढवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा निश्चित हातभार लागेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र भूगोल परिषद, पुणे आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण शेती आणि ग्रामीण विकास या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सौ.शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. प्रमुख अतिथी श्रीलंका येथील केलियाना विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. ए. जी. अमरसिंगे, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचे चेअरमन डॉ. बी. एन. गोफणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. अर्जुन मुसमाडे,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य डॉ. राम पवार आदीसह उ भूगोल अभ्यासक व संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणल्या, ज्वलंत प्रश्नावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र भविष्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे.
प्रदुषण विरहित, पर्यावरणाचा समतोल बिघडून न देता विकास व्हायला हवा. आपण औद्योगिक क्रांती, हरित क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांती, ननो टेक्नॉलॉजीची क्रांती आणि आता येऊ घातलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती यामध्ये आपण केवळ भैतिक विकासाचाच विचार केलेला दिसेल. पुढे जाणे एवढेच उद्दिष्ट दिसेल. या पृथ्वीतलावर मानवाशिवाय ही अनेक जीवजंतू, प्राणी, पशु-पक्षी आहेत याचा आपल्याला विसर पडलेला दिसतोय, विकास होणे आवश्यक आहेच परंतु त्याला जीवसृष्टीच्या कल्याणाचे भान असले पाहिजे. ते भान आपल्याला आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. आज पर्यावरणाचा किती प्रकारांनी -हास चालू आहे. त्यामुळे या पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी साक्षरता धोक्यात आली आहे. जिओ जीवस्य जीवनम या सूत्राप्रमाणे पृथ्वीवर सर्व जीवांची आवश्यकता आहे. केवळ मानव केंद्रित विकास करण्याने मानवाचेही अस्तित्व धोक्यात येत आहे. याचे आपल्याला भान उरले नाही, असे म्हणण्याची परिस्थिती आपण स्वतःच निर्माण केली आहे. बेसुमार औद्योगीकरण, हानिकारक रसायनांची निर्मिती आणि त्याचा बेसुमार वापर, रसायनांच्या कारखान्यातील अत्यंत घातक सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणे, रासायनिक खतांचा अनिबंध वापर, यामुळे सर्व अन्नसाखळीच प्रदूषित झाली आहे. कार्बन डाय-ऑक्साइडचे अतिउत्सर्जन, वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढणारी शहरे आणि त्यामुळे निर्माण झालेले सर्व प्रकारचे प्रदूषण, त्याचवेळी ओस पडत चाललेली खेडी ही परस्पर विरुद्ध स्थिती तर निर्माण होत आहेच, त्यातच खेड्यांची अवस्था इतकी दयनी झाली आहे की अस्ताव्यस्त पसरणारी शहरे आणि ओस पडणारी खेडे यामुळे दोन्हीकडे समस्या निर्माण झाल्या आहेत.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय शेती हा धर्म आहे. तो आपण व्यवसाय मानत नाही. तरी जीवन जगायचे म्हणजे पैसा हवा. तो शेतीतून मिळवायचा म्हणून त्याला आता आपणही व्यवसाय म्हणतो. परंतु तो आपण व्यवसाय सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून ठेवलेला नाही. रासायनिक खतांच्या खतांचा मागच्या ५० वर्षात आपण इतका बेसुमार वापर केला की आपल्या सर्व सर्व जमिनी नापिकीकडे निघाल्या आहेत. हे आहेच परंतु त्यातून तयार होणारे अन्न आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक तयार होत आहे, त्यामुळे आजार वाढत चालले. आरोग्य आरोग्य धोक्यात आले. एवढे कमी की काय म्हणून आता शेतात तणनाशके वापरली जातात. ती तर शेतीच्या आणि माणसाच्या मुळावरच उठले आहेत. त्यातून आपण दररोज विषयच खातो. हेही आपल्याला लक्षात येत नाही. यामुळे सर संपूर्ण जीवनसृष्टीची अन्नसाखळी प्रदूषित झाली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न सर्व भारतीयांच्या मनात पेरले आहे. त्या दिशेने साऱ्याच पातळण्यांवर आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राम पवार यांनी केले यावेळी.विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.