मंगळवारी दुपारी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिलिपराजे गेल्याचा एकरुखे गावामध्ये मेसेज येवुन धडकला आणि सर्वांचाच काळजाचा ठेकाच चुकला प्रंचड इच्छाशक्ती, वाचनाची विलक्षण आवड, नव- नविण माणसे जोडण्याची व जोडलेल्या माणसांच्या ह्रदयात स्थान निर्माण करण्याची त्यांच्यात आसलेली एक विशेष कला तर आपल्या अभ्यासरुपी मार्मिक शब्दांतुन भाषणाव्दारे समोरच्याच्या काळजावर अचुकपणे होणारे घाव यामुळे गणेश परिसरात त्यांचा एक वेगळाच दबदबा होता
राहाता तालुक्यातील एकरुखे या खेडेगावातुन दिलिपराजे हनुमंतराव सातव यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरवात केली राजकारणाच्या माध्यमातून एकरुखे गाव त्यांनी मुंबई पासुन दिल्ली पर्यंत पोहचविले
ग्रामपंचायत सदस्य ते राष्ट्रवादी सरचिटणिस सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष अशी अनेक विविध सामाजिक व राजकीय पदे त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत भुषवित असतांनाच आपल्या कामाच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय कसा मिळेल याकडे त्यांचे विषेश लक्ष असायचे त्या माध्यमातुन त्यांनी रिक्षा युनियन व पतसंस्थेची देखिल स्थापना केली होती राजकारण करत आसतांनाच सामाजकारणात व धार्मिक कामात ते नेहमिच आग्रेसर असत याचेच एक छोटे उदाहरण म्हणजे माता वज्रेश्वरीच्या याञा उत्सवात कुस्ती हंगामात ते कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीची सुरवात करण्या पासुन ते विजयी पहिलवानांना विजयाच्या शुभेच्छा तर पराजित झालेल्या पहिलवाणास देखिल तू खुप भारी खेळलासरे खेळ म्हंटल्यावर जय पराजय आलाच पुढील वर्षी तुझाज विजय होणार असे त्यांचे आश्वासक शब्द व या शब्दांच्या जादूने पराभुत पहिलवानांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद जाणवायचा.
आजच्या मितीस राजकारण म्हणजे जणु महाभारतच झाले आहे आपले सगे सोयरे जरी आपल्या समोर ऊभे ठाकले तरी आता माघार घ्यायची नाही आणि राजकारण संपले तरी त्यातली खुन्नस माञ विसरायची नाही यास माञ राजे अपवाद निवडणूक संपली विरोध संपला आता आपआपल्या कामाला लागा असा त्यांचा शिरस्ता असल्याने राजकारणातील एक अजातशञू म्हणुन त्यांची ओळख होती अश्या एका लढवय्या व्यक्तीमत्वास गमविल्याचे दुःख सर्वांनाच आहे
त्यांचा समर्थकच नव्हे तर राजकारणात विरोधक असणाऱ्यांचा देखिल राजे आपल्यातुन निघुन गेल्याची बातमि काणावर पडताच मनात चलबिचल होत डोळ्यात आसवे दाटुन आली
मरावे परी किर्ती रुपी जगावे या समर्थ रामदासांच्या पांक्तीला साजेसा माणुस म्हणजेच एकरुख्याचा कोहिणुर खऱ्या आर्थाने हरपला अश्या थोर व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन- पञकार अविनाश डोखे (एकरुखे )