अकोले( जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या दोन-तीन दिवसापासून भंडारदरा व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाने रुद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर भंडारदरा व निळवंडे धरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होताना दिसत आहे.
त्यामुळे भंडारदरा ,निळवंडे धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग प्रवरा पात्रात सोडण्यात आला आहे.प्रवरा नदीकाठच्या गावानी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरीही जनतेने सतर्क राहावे अशी प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहे.भंडारदरा धरणातून २३ हजार ८०६ क्युसेकने तर निळवंडे धरणातून २१ हजार ७०० क्युसेकने पाणी प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आले असुन पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पुर येणार आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी . पावसाने असाच जोरदार जर कायम राहिलात तर नदीपात्रामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.