राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असलेल्या सुनील शांताराम सदाफळ यांच्या पंचकृष्णा डेअरी प्रॉडक्टच्या प्रांगणात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून डेअरीच्या लॅब मध्ये जोरदार भांडणातून लॅब साहित्याची मोठी नुकसान केली, तर दुसऱ्या घटनेत १५ चारी पासून एक किलोमीटर अंतरावर एकरुखे शिवारातील बशीर शेख यांच्यावस्ती वरती रात्री साडे आकरा वाजता दोन बिबट्यानी शेळीवर हल्ला चढवत शेळीस ठार केले असता इतर शेळ्याच्या आवाजाने शेख कुटुंब जागे झाले व त्यानीं आरडाओरड केली असता मारलेली शेळी तिथेच टाकून दोन्ही बिबटे पळून गेल्याचे बशीर शेख यांनी सांगितले आहे या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे
तर पंचकृष्णा डेअरीगेट जवळ राखण करणाऱ्या राखणदारावर बिबट्याने हल्ला करण्यापूर्वीच भयभीत झालेल्या श्वानाने रखवालदाराजवळ भुंकत जाऊन त्यास जागे केले .केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून रखवालदाराचे प्राण या श्वानाने वाचवले. गेल्या अनेक दिवसापासून राहाता येथील १५ चारी परिसरात तसेच जवळपासच्या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर वाढतोय. अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या ,जनावरे व कुत्रे यांचा फडशा बिबट्यांनी केल्याच्या घटना घडत आहेत. काल पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्यांनी पंचकृष्णा डेअरी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला .गेटवर असलेल्या रखवालदार झोपेत असल्याने त्याच्याकडे जाणाऱ्या बिबट्यास पाहून तेथे असलेल्या कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली .त्यामुळे रखवालदारास जाग आली बिबट्यास पाहून भयभित रखलदराने यास हाकलण्यास प्रयत्न केला .बिबट्यांनी यावेळी जवळच असलेल्या लॅब मध्ये प्रवेश केला दरवाजा बंद झाल्यामुळे बिथरलेल्या बिबट्यांनी आत मध्ये दूध चेक करण्याच्या अनेक लॅब साहित्याची मोठी नुकसान केली . बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यामुळे कार्यालयाच्या जाड काचेला धडक देत काच फोडून बिबट्या बाहेर पळाला. जवळच असलेल्या शेतामध्ये बिबट्या फरार झाले. बिबट्यांचा हा थरथराट पाहण्यासाठी आजूबाजूच्या अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .मात्र भीतीपोटी कोणीही पुढे येत नव्हते. दत्तात्रय सदाफळ यांनी ही बातमी सुनील सदाफळ यांना फोनवर कळवून घटनास्थळी बोलावून घेतले .
या प्रकारानंतर चितळी रोड व १५ चारी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांचा मोठा वावर असून या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत आहेत.शासनाने व वन विभागाने या परिसरात आजच्या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित सर्व भागात पिंजरे लावून मोकाट वावरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व भयभीत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे.
सुनील सदाफळ,(पंचकृष्ण डेअरी मालक,राहाता)