spot_img
spot_img

कुणाच्या पोटदुखीतून युतीत विघ्न निर्माण झालं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार- खासदार श्रीकांत शिंदे

कल्याण (जनता आवाज वृत्तसेवा):- अलीकडच्या काळामध्ये  महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कुठे व कधी कसे घडेल हे सांगता येत नाही. कारण भाजप व शिंदे गटात सुद्धा सर्व काही अलबेला असे सारखे दाखवतात. परंतु त्यांच्या सुद्धा वादाची ठिणगी पडतआहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत विघ्न निर्माण झालं असेल तर माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, ” असं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याबद्दल पंढरपूर येथे रवींद्र चव्हाण यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर चव्हाण यांनी सांगितलं की, “भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने घेतलेला निर्णय त्यांच्या मनाला पटत असेल. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे इच्छा आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेलं व्यक्त होणं फक्त भाजपात होतं. म्हणून त्यांनी ते व्यक्त केलं आहे. अधिकची माहिती वरिष्ठांना आम्ही देऊ.”
 यावर रवींद्र चव्हाण हे म्हटले की, स्थानिक कार्यकर्ते व तेथील नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील. जो निर्णय घेतला जाईल त्याची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविण्यात येईल.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!