आष्टी (जनता आवाज वृत्तसेवा ):- सध्या नगर व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगजेब स्टेटस वरून काढलेला सकल हिंदू मराठा मोर्चा यानंतर झालेला दगडफेकीमुळे निर्माण झालेला तणाव त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक प्रमाणात सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात औरंगजेबाचं वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने रात्रीपासून तणावाचे वातावरण असून पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर आज, ९ जून रोजी आष्टी येथे बंद पाळण्यात आला आहे. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे देण्यात आली आहे.



