संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद अन शेतकर्यांच्या मालकीचा होता. मात्र काहीं जण जणू काही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अश्या प्रकारे कारभार सुरू केला .तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आ. अमोल खताळ यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकी मध्ये जाहीर करत संगमनेर भागसहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजविला.
कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आमदार खताळ बोलत होते.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ दादाभाऊ गुंजाळ वैद्यकीय विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ अशोक इथापे, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शेतकरी नेते संतोष रोहोम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठलराव घोरपडे तालुकाप्रमुख रमेश काळे भाजप सरचिटणीस रोहिदास साबळे, संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोधळे, गोरक्ष कापकर, बापूसाहेब देशमुख यांच्यासह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले की ज्याप्रमाणे हा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतक ऱ्यांच्या मालकीचा होता. मात्र या साखर कारखान्यावर काहीं जण मालकी हक्क गाजवत आहे. तो कारखाना पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदाच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यासाठी आता ही निवडणूक ऊस उत्पादक सभासदांनीच हातात घेतली आहे.त्यामुळे आपण सर्व जण ही निवडणूक पूर्णताकदीनिशी लढविणार आहोत.ही निवडणूक नुसती लढावयची नाही तर जिंकायची सुद्धा आहे.त्या दृष्टीने आपण सर्वजण मतदारा सभासद पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे आवाहन करत आ. खताळ म्हणाले की साखर कारखाना निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी असे आवाहन करून यानिवडणुकी च्या काळात कारखाना यंत्रणा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ म्हणाले की, जशी विधानसभा निवडणूक लढवून आपण जिंकली आहे. तशीच संगमनेर भाग सहकारी साखरकारखान्याची सुद्धा निवडणुक लढवून जिंकायची आहे. त्या साठी धनाजी संताजी पुढारी हे कोणीच आपले उमेदवार राहणार नाही तर या निवडणुकीत सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हेच उमेदवार राहणार आहे तर ही निवडणुक महायुती म्हणून नाही तर शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनल या बॅनरखाली लढवणार आहोत.निवडणूक नपारदर्शी होण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्या बाबत आपण निवडणूक अधिकार्यांना सूचना कराव्यात अशी विनंती आमदार करता यांना करत ते म्हणाले की ज्या शेतकऱ्याचा ऊस गळीतला गेला आहे. अशाच ऊस उत्पादकांना निवडणुकीला उभे राहता येईल असेही गुंजाळ यांनी ठणकावून सांगितले यावेळी अनेक उत्पादक सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




Total Users : 636768