spot_img
spot_img

देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान करत आहे – कर्नल भरत भल्ला

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):-  त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल त्रिमूर्ती नगर नेवासा फाटा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मिलिटरी इंजीनियरिंग कॉलेज, पुणे येथील कर्नल भरत भल्ला उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “आज आपण मुक्त भारतात श्वास घेत आहोत ते अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे शक्य झाले. त्या बलिदानाचा सन्मान ठेवणे हीच खरी श्रद्धांजली आहे. तसेच आपले पालक आपल्यासाठी जे कष्ट घेतात त्यांची जाणीव ठेवून अभ्यास करा, तरच तुम्ही जीवनात उत्तुंग यश मिळवू शकाल. देशाचे भविष्य घडविण्याचे मोलाचे कार्य त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान करत आहे.”

कार्यक्रमाला सौ. बबीता भरत भल्ला आणि नाशिक क्राईम ब्रँचच्या डी.वाय.एस.पी सौ. सीमा परिहार मॅडम या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

त्रिमूर्ती संकुलातील मध्यवर्ती कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. संस्थेचे आराध्य दैवत भगवंत दत्तात्रयांची व पैस खांबाची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सैनिकी बँड पथकाने वाजत गाजत मान्यवरांना कार्यक्रम स्थळी नेण्यात आले तत्पूर्वी संकुलातील अमर जवान स्तंभास व शिक्षण महर्षी साहेब रावजी घाडगे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल भरत भल्ला यांनी परेड निरीक्षण केल्यानंतर मान्यवरांना परेडमधील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सलामी दिली . ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नाशिक येथील क्राईम ब्रँच सीमा परिहार यांनी देखील मुलांमधील संस्कार शिस्त याबद्दल गौरव उद्गार काढले. राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती नवोदय एन एम एम एस एन टी एस दहावी व बारावी मध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच डीएड बीएड डी फार्मसी बी फार्मसी सिनियर कॉलेज मधील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळाच्या माध्यमातून संस्थेचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी घोडेस्वारी बरोबरच आर्चरीचे राष्ट्रीय पंच अभिजीत दळवी व त्यांच्या टीमने तसेच रायफल शूटिंग चे प्रशिक्षक व त्यांच्या टीमने रायफल शूटिंग चे चित्र थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा एडवोकेट सुमती साहेबराव घाडगे पाटील, सुभेदार श्री व सौ कदम, माजी विद्यार्थी महेश शिंदे,संस्थेचे विश्वस्त शरद हरिभाऊ गाडगे पाटील, सौ अनिता गाढवे पाटील, चेतन चव्हाण पाटील, प्राचार्य सोपान काळे दिपाली बाविस्कर, जोसेफ,समन्वयक दत्तात्रय वांढेकर, समन्वयका डॉक्टर अनुराधा गोरे, प्राचार्य चांगदेव आरसुळे, वित्त व्यवस्थापक अनिता बोरसे, निवासी प्राचार्य एकनाथ कापसे, उपप्राचार्य शांतीलाल मेहेत्रे, परवेज पठाण माऊली शिंदे, विभाग प्रमुख बाळासाहेब साबळे, जितेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, संतोष राऊत, अशोक कानवडे, नामदेव ताके, अंजली होन, राजेंद्र कात्रस, क्रीडा विभाग प्रमुख संभाजी निकाळजे, महादेव काकडे, सैनिकी विभाग प्रमुख परमेश्वर कसाळ,भागवत खताळ, किरण शिंदे सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सोपान काळे यांनी केले तर सूत्रसंचालन उपप्राचार्य अरविंद देशमुख व प्राध्यापक लक्ष्मण दळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महादेव काकडे यांनी मानले कार्यक्रमाची सांगतात ज्ञानेश्वराच्या पसायदान यांनी झाली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!